| संजयाकडून अर्जुनाच्या विषादाचे वर्णन |

सञ्जय उवाच

श्लोक क्रं १

तं तथा कृपयाविष्टमश्रुपूर्णाकुलेक्षणम् ।

विषीदन्तमिदं वाक्यमुवाच मधुसूदनः || १||


अध्याय दुसरा

श्रीकृष्णाने अर्जुनाच्या प्रोह व कायरतापूर्ण विवादाची निंदा करणे आणि युद्धासाठी त्याला प्रोत्साहित करणे...


                  श्रीभगवानुवाच

कुतस्त्वा कश्मलमिदं विषमे समुपस्थितम् 

अनार्यजुष्टमस्वर्ग्यमकीर्तिकरमर्जुन.(२)


श्लोक अर्थ:- श्रीभगवान् म्हणाले- हे अर्जुना ! या भलत्याच वेळी हा मोह तुला कशामुळे उत्पन्न झाला ? कारण हा थोरांनी न आचरिलेला, स्वर्ग मिळवून न देणारा आणि कीर्तिकारकही नाही.(२)


श्रीमद्भगवद्गीता अध्याय दुसरा श्लोक क्रं ०३ 


क्लैब्यं मा स्म गमः पार्थ नैतत्त्वय्युपपद्यते 

क्षुद्रं हृदयदौर्बल्यं त्यक्त्वोत्तिष्ठ परन्तप ॥ ३॥


श्लोक अर्थ:- म्हणून हे पार्थ! षंढपणा पत्करू नकोस. हा तुला शोभत नाही. हे परंतपा ! अंतःकरणाचा तुच्छ दुबळेपणा सोडून देऊन युद्धाला उभा राहा. (३)


श्रीमद्भगवद्गीता अध्याय दुसरा श्लोक क्रं ०४


 अर्जुनाने भीष्म-द्रोण इत्यादी पूज्य गुरुजनांना मारण्यापेक्षा भिक्षात्राने

निर्वाह करणे श्रेष्ठ आहे, असे सांगणे ।


                अर्जुन उवाच

कथं भीष्ममहं सङ्ख्ये द्रोणं च मधुसूदन ।

इषुभिः प्रति योत्स्यामि पूजार्हावरिसूदन ||४||


श्लोक अर्थ:-अर्जुन म्हणाला- हे मधुसूदना युद्धात मी भीष्मपितामहांच्या आणि द्रोणाचार्यांच्या विरुद्ध बाणांनी कसा लढू ? कारण हे अरिसूदना ! ते दोघेही पूज्य आहेत..||४|


श्रीमद्भगवद्गीता अध्याय दुसरा श्लोक क्रं ०५


 गुरूनहत्वा हि महानुभावान् श्रेयो भोक्तुं भैक्ष्यमपीह लोके 

हत्वार्थकामांस्तु गुरूनिहैव भुञ्जीय भोगान् रुधिरप्रदिग्धान् ॥५॥


श्लोक अर्थ:-म्हणून या महानुभाव गुरुजनांना न मारता मी या जगात भिक्षा मागून खाणेही कल्याणकारक समजतो. कारण गुरुजनांना मारूनही या लोकात रक्ताने माखलेले अर्थ व कामरूप भोगच ना भोगावयाचे !(५)


युद्ध करणे किंवा न करणे यांविषयी अर्जुनाचा संशय ।


श्रीमद्भगवद्गीता अध्याय दुसरा श्लोक क्रं ०६


न चैतद्विद्मः कतरन्नो गरीयो यद्वा जयेम यदि वा नो जयेयुः ।

यानेव हत्वा न जिजीविषामस्तेऽवस्थिताः प्रमुखे धार्तराष्ट्राः ॥६॥


श्लोक अर्थ:-युद्ध करणे व न करणे या दोहोंपैकी आम्हांला काय श्रेष्ठ आहे, हे कळत नाही. किंवा आम्ही त्यांना जिंकू की ते आम्हांला जिंकतील, हेही आम्हांला माहीत नाही. आणि ज्यांना मारून आम्हांला जगण्याचीही इच्छा नाही, तेच आमचे बांधव धृतराष्ट्रपुत्र आमच्या विरुद्ध युद्धाला उभे आहेत. (६)


श्रीमद्भगवद्गीता अध्याय दुसरा श्लोक क्रं ०७

                                                                                                                  मोह व कायरतारूप असणाऱ्या दोषांचे वर्णन करीत असलेल्या भगवंतांना शरण जाऊन त्यांना कल्याणप्रद उपदेश देण्यासाठी अर्जुनाने केलेली विनंती. 


कार्पण्यदोषोपहतस्वभावः पृच्छामि त्वां धर्मसम्मूढचेताः

 यच्छ्रेयः स्यान्निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेऽहं शाधि मां त्वां प्रपन्नम् ॥७॥

 

श्लोक अर्थ:-करुणाव्याप्त दैन्यामुळे ज्याचा मूळ स्वभाव नाहीसा झाला आहे. धर्माधर्माचा निर्णय करण्याविषयी ज्याची बुद्धी असमर्थ आहे, असा मी तुम्हांला विचारीत आहे की, जे साधन खात्रीने कल्याणकारक आहे, ते मला सांगा. कारण मी तुमचा शिष्य आहे. म्हणून तुम्हांला शरण आलेल्या मला उपदेश करा..


श्रीमद्भगवद्गीता अध्याय दुसरा श्लोक क्रं ०८


 अर्जुनाने त्रैलोक्याचे निष्कंटक राज्य हे सुद्धा शोकनिवारणाचे कारण न मानता वैराग्याचा भाव प्रदर्शित करणे. 


न हि प्रपश्यामि ममापनुद्याद् यच्छोकमुच्छोषणमिन्द्रियाणाम् ।

अवाप्य भूमावसपत्नमृद्धं राज्यं सुराणामपि चाधिपत्यम् ॥८॥


श्लोक अर्थ:-कारण, पृथ्वीचे शत्रुरहित व धन-धान्यसमृद्ध राज्य मिळाले किंवा देवांचे स्वामित्व जरी मिळाले, तरी माझ्या इंद्रियांना शोषून टाकणारा शोक जो दूर करू शकेल, असा उपाय मला दिसत नाही.(८)


श्रीमद्भगवद्गीता अध्याय दुसरा श्लोक क्रं ०९


(संजयाकडून वर्णित) अर्जुनाने युद्ध न करण्याचे सांगून गप्प होणे आणि भगवंतांनी हसत बोलणे. ]


एवमुक्त्वा हृषीकेशं गुडाकेशःपरन्तप ।

न योत्स्य इति गोविन्दमुक्त्वा तूष्णीं बभूव ह ॥९॥


श्लोक अर्थ:-संजय म्हणाला- हे राजा ! निद्रेवर ताबा असलेल्या अर्जुनाने अन्तर्यामी श्रीकृष्णाला एवढे बोलून 'मी युद्ध करणार नाही' असे स्पष्टपणे सांगितले व तो गप्प झाला.(९)


श्रीमद्भगवद्गीता अध्याय दुसरा श्लोक क्रं १०


तमुवाच हृषीकेशः प्रहसन्निव भारत ।

सेनयोरुभयोर्मध्ये विषीदन्तमिदं वचः॥

१०॥


श्लोक अर्थ:-हे भरतवंशी धृतराष्ट्र महाराज ! अन्तर्यामी भगवान श्रीकृष्ण दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी शोक करणाऱ्या त्या अर्जुनाला हसल्यासारखे करून असे म्हणाले..(१०)


श्रीमद्भगवद्गीता अध्याय दुसरा श्लोक क्रं ११


 भगवंतांचा अर्जुनाला उपदेश प्रारंभ |

                श्रीभगवानुवाच


अशोच्यानन्वशोचस्त्वं प्रज्ञावादांश्च भाषसे ।

गतासूनगतासूंश्च नानुशोचन्ति पण्डिताः ।।११।।


श्लोक अर्थ:-श्रीभगवान म्हणाले - हे अर्जुना ! तू ज्यांचा शोक करू नये, अशा माणसांसाठी शोक करतोस आणि विद्वानांसारखा युक्तिवाद करतोस. परन्तु ज्यांचे प्राण गेले आहेत त्यांच्यासाठी आणि ज्यांचे प्राण गेले नाहीत,त्यांच्यासाठीही विद्वान माणसे शोक करीत नाहीत.(११)


श्रीमद्भगवद्गीता अध्याय दुसरा श्लोक क्रं १२


आत्म्याच्या नित्यतेचे आणि निर्विकारतेचे निरूपण |


न त्वेवाहं जातु नासं न त्वं नेमे जनाधिपाः

न चैव न भविष्यामः सर्वे वयमतः परम् ॥ १२॥

 

श्लोक अर्थ:-मी कोणत्याही काळी नव्हतो, तू नव्हतास किंवा हे राजे नव्हते असेही नाही आणि यापुढे आम्ही सर्वजण असणार नाही, असेही नाही. (१२)


श्रीमद्भगवद्गीता अध्याय दुसरा श्लोक क्रं १३


देहिनोऽस्मिन्यथा देहे कौमारं यौवनं जरा ।

तथा देहान्तरप्राप्तिर्धीरस्तत्र न मुह्यति ॥ १३ ॥


श्लोक अर्थ:-ज्याप्रमाणे जीवात्म्याला या शरीरात बालपण, तारुण्य आणि वार्धक्य येते, त्याचप्रमाणे दुसरे शरीर मिळते. याविषयी धीर पुरुषांना मोह उत्पन्न होत नाही.(१३)


श्रीमद्भगवद्गीता अध्याय दुसरा श्लोक क्रं १४


देहिनोऽस्मिन्यथा देहे कौमारं यौवनं जरा ।

तथा देहान्तरप्राप्तिर्धीरस्तत्र न मुह्यति ॥ १४॥


श्लोक अर्थ:-ज्याप्रमाणे जीवात्म्याला या शरीरात बालपण, तारुण्य आणि वार्धक्य येते, त्याचप्रमाणे दुसरे शरीर मिळते. याविषयी धीर पुरुषांना मोह उत्पन्न होत नाही.(१४)


श्रीमद्भगवद्गीता अध्याय दुसरा श्लोक क्रं १५


 वरील सहनशीलता ही मोक्ष प्राप्तीचा हेतू असल्याचे सांगणे. 


यं हि न व्यथयन्त्येते पुरुषं पुरुषर्षभ ।

समदुःखसुखं धीरं सोऽमृतत्वाय कल्पते ।।१५।।


श्लोक अर्थ:-कारण हे श्रेष्ठ पुरुषा ! सुख-दुःख समान मानणाऱ्या ज्या धीर पुरुषाला हे इंद्रियांचे विषयांशी संयोग व्याकूळ करीत नाहीत, तो मोक्षाला योग्य ठरतो.(१५)


श्रीमद्भगवद्गीता अध्याय दुसरा श्लोक क्रं १६


| सत् व असत् यांचे लक्षण. |


नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सतः

 उभयोरपि दृष्टोऽन्तस्त्वनयोस्तत्त्वदर्शिभिः ॥ १६॥


श्लोक अर्थ:-असत् वस्तूला अस्तित्व नाही आणि सत् वस्तूचा अभाव नसतो. अशा रीतीने या दोहोंचेही सत्य स्वरूप तत्त्वज्ञानी पुरुषांनी पाहिले आहे. (१६)


श्रीमद्भगवद्गीता अध्याय दुसरा श्लोक क्रं १७


[ सत् व असत् वस्तूंच्या स्वरूपाचे निरूपण आणि अर्जुनाला युद्ध करण्याची आज्ञा. ]


अविनाशि तु तद्विद्धि येन सर्वमिदं ततम् ।

विनाशमव्ययस्यास्य न कश्चित्कर्तुमर्हति ॥ १७॥


श्लोक अर्थ:-ज्याने हे सर्व जग दिसणाऱ्या सर्व वस्तू - व्यापल्या आहेत, त्याचा नाश नाही, हे तू लक्षात ठेव. त्या अविनाशीचा नाश कोणीही करू शकत नाही.(१७)


श्रीमद्भगवद्गीता अध्याय दुसरा श्लोक क्रं १८


अन्तवन्त इमे देहा नित्यस्योक्ताः शरीरिणः 

अनाशिनोऽप्रमेयस्य तस्माद्युध्यस्व भारत ।। १८ ।।


श्लोक अर्थ:-या नाशरहित, मोजता न येणाऱ्या, नित्यस्वरूप जीवात्म्याची हीशरीरे नाशिवंत आहेत, असे म्हटले गेले आहे. म्हणून हे भरतवंशी अर्जुना ! तू युद्ध कर...(१८)


श्रीमद्भगवद्गीता अध्याय दुसरा श्लोक क्रं १९


आत्म्याला मरणारा किंवा मारणारा असे समजणारा हा अज्ञानी असल्याचे सांगणे. |


य एनं वेत्ति हन्तारं यश्चैनं मन्यते हतम् 

उभौ तौ न विजानीतो नायं हन्ति न हन्यते ॥ १९॥


श्लोक अर्थ:-जो या आत्म्याला मारणारा असे समजतो, तसेच जो 'हा (आत्मा) 'मेला' असे मानतो, ते दोघेही अज्ञानी आहेत. कारण हा आत्मा वास्तविक पाहता कोणाला मारीत नाही आणि कोणाकडून मारला जात नाही. (१९)


श्रीमद्भगवद्गीता अध्याय दुसरा श्लोक क्रं २०


| जन्म इत्यादी सहा विकारांनी रहित असलेल्या आत्मस्वरूपाचे निरूपण ]


न जायते म्रियते वा कदाचिन्नायं भूत्वा भविता वा न भूयः

अजो नित्यः शाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे ॥२०॥


श्लोक अर्थ:-हा आत्मा कधीही जन्मत नाही आणि मरतही नाही. तसेच हा एकदा उत्पन्न झाल्यावर पुन्हा उत्पन्न होणारा नाही. कारण हा जन्म नसलेला, नित्य,सनातन आणि प्राचीन आहे. शरीर मारले गेले तरी हा मारला जात नाही. (२०)


श्रीमद्भगवद्गीता अध्याय दुसरा श्लोक क्रं २१


आत्मतत्त्ववित् हा कोणासही मारणारा किंवा मारून टाकविणारा नसतो, असे सांगणे. |


वेदाविनाशिनं नित्यं य एनमजमव्ययम् 

कथं स पुरुषः पार्थ कं घातयति हन्ति कम् ॥ २१ ॥


श्लोक अर्थ:-हे पार्था ! जो पुरुष, "हा आत्मा नाशरहित, नित्य, न जन्मणारा व न बदलणारा आहे", हे जाणतो, तो कोणाला कसा ठार करवील किंवा कोणाला कसा ठार करील ? (२१)


श्रीमद्भगवद्गीता अध्याय दुसरा श्लोक क्रं २२


मनुष्य कपडे बदलतो, याचे उदाहरण देऊन शरीरांतर प्राप्तीचे तत्त्व समजावून सांगणे.] 


वासांसि जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोऽपराणि।

तथा शरीराणि विहाय जीर्णान्यन्या नि संयाति नवानि देही (२२)


[आणि जर तू म्हणशील की मी तर शरीराच्या वियोगामुळे शोक करतो,तर तेही योग्य नव्हे,करण-]


श्लोक अर्थ:-ज्याप्रमाणे माणूस जुनी वस्त्रे टाकून देऊन दुसरी नवी वस्त्रे घेतो, त्याचप्रमाणे जीवात्मा जुनी शरीरे टाकून दुसऱ्या नव्या शरीरात जातो. (२२)


श्रीमद्भगवद्गीता अध्याय दुसरा श्लोक क्रं २३


[आत्मतत्त्व हे अच्छेद्य, अदाहा, अक्लेद्य आणि अशोध्य तसेच नित्य, सर्वगत,स्थाणू, अचल, सनातन, अव्यक्त, अर्चित्य आणि निर्विकार आहे, असे सांगून त्याच्यासाठी शोक करणे, हे अयोग्य असल्याचे सांगणे.]


नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः । 

न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः ||२३||


श्लोक अर्थ:-या आत्म्याला शस्त्रे कापू शकत नाहीत, विस्तव जाळू शकत नाही,पाणी भिजवू शकत नाही आणि वारा वाळवू शकत नाही.(२३)


श्रीमद्भगवद्गीता अध्याय दुसरा श्लोक क्रं २४


अच्छेद्योऽयमदाह्योऽयमक्लेद्योऽशोष्य एव च ।

नित्यः सर्वगतः स्थाणुरचलोऽयं सनातनः ||२४||


श्लोक अर्थ:-कारण हा आत्मा कापता न येणारा, जाळता न येणारा, भिजवता न येणारा आणि निःसंशय वाळवता न येणारा आहे. तसेच हा आत्मा नित्य, सर्वव्यापी, अचल, स्थिर राहणारा आणि सनातन आहे. (२४)


श्रीमद्भगवद्गीता अध्याय दुसरा श्लोक क्रं २५


अव्यक्तोऽयमचिन्त्योऽयमविकार्योऽयमुच्यते ।

 तस्मादेवं विदित्वैनं नानुशोचितुमर्हसि ॥ २५॥


श्लोक अर्थ:-हा आत्मा अव्यक्त आहे, अचिन्त्य आहे आणि विकाररहित आहे, असे म्हटले जाते. म्हणून हे अर्जुना ! हा आत्मा वर सांगितल्याप्रमाणे आहे, हे लक्षात घेऊन तू शोक करणे योग्य नाही.(२५)


श्रीमद्भगवद्गीता अध्याय दुसरा श्लोक क्रं २६


आत्मा हा जन्मणारा, मरणारा असा मानला तरीही शरीराची अनित्यता जाणून शोक करणे हे अयोग्य |


अथ चैनं नित्यजातं नित्यं वा मन्यसे मृतम् ।

तथापि त्वं महाबाहो नैवं शोचितुमर्हसि ॥ २६॥


श्लोक अर्थ:-परन्तु, जर तू आत्मा नेहमी जन्मणारा व नेहमी मरणारा आहे, असे मानत असशील, तरीसुद्धा हे महाबाहो ! तू अशा रीतीने शोक करणे योग्य नाही. (२६)


श्रीमद्भगवद्गीता अध्याय दुसरा श्लोक क्रं २७


जातस्य हि ध्रुवो मृत्युर्ध्रुवं जन्म मृतस्य च ।

तस्मादपरिहार्येऽर्थे न त्वं शोचितुमर्हसि ॥२७॥


श्लोक अर्थ:-कारण असे मानल्यास त्यानुसार जन्मास आलेल्याला मृत्यू निश्चित आहे आणि मेलेल्याला जन्म निश्चित आहे. म्हणून या उपाय नसलेल्या गोष्टींविषयीही तू शोक करणे योग्य नाही.(२७)


श्रीमद्भगवद्गीता अध्याय दुसरा श्लोक क्रं २८


अव्यक्तादीनि भूतानि व्यक्तमध्यानि भारत

अव्यक्तनिधनान्येव तत्र का परिदेवना ॥२८॥


आणि ही भीष्मादिकांची शरीरे मायामय असल्यामुळे अनित्य आहेत, यामुळे शरीरांच्या विषयीही शोक करणे योग्य नाही; कारण-


श्लोक अर्थ:-हे अर्जुना ! सर्व प्राणी जन्मापूर्वी अप्रगट असतात आणि मेल्यानंतरही अप्रगट होणार असतात. फक्त मध्ये प्रगट असतात. मग अशा स्थितीत शोक कसला करायचा?(२८)


श्रीमद्भगवद्गीता अध्याय दुसरा श्लोक क्रं २९


|आत्मतत्त्वाचा द्रष्टा व श्रोता दुर्लभ असल्याचे प्रतिपादन.|


आश्चर्यवत्पश्यति कश्चिदेनमाश्चर्यवद्वदति तथैव चान्यः ।

 आश्चर्यवच्चैनमन्यः श्रणोति श्रुत्वाप्येनं वेद न चैव कश्चित् ॥ २९॥


श्लोक अर्थ:-एखादा महापुरुषच या आत्म्याला आश्चर्याप्रमाणे पाहतो आणि तसाच दुसरा एखादा महापुरुष या तत्त्वाचे आश्चर्याप्रमाणे वर्णन करतो. तसेच आणखी एखादा अधिकारी पुरुषच याच्याविषयी आश्चर्याप्रमाणे ऐकतो आणि कोणी कोणी तर ऐकूनही याला जाणत नाहीत.(२९)


श्रीमद्भगवद्गीता अध्याय दुसरा श्लोक क्रं ३०


आत्मतत्त्व हे अवध्य असल्यामुळे कोणत्याही प्राण्याने शोक करणे हे अयोग्य |


देही नित्यमवध्योऽयं देहे सर्वस्य भारत 

तस्मात्सर्वाणि भूतानि न त्वं शोचितुमर्हसि ॥३०॥


श्लोक अर्थ:-हे अर्जुना ! हा आत्मा सर्वांच्या शरीरात नेहमीच अवध्य असतो म्हणून सर्व प्राण्यांच्या बाबतीत तू शोक करणे योग्य नाही.(३०)


श्रीमद्भगवद्गीता अध्याय दुसरा श्लोक क्रं ३१


क्षात्रधर्माच्या दृष्टीने युद्ध हा अर्जुनाचा स्वधर्म असल्याचे सांगून त्याचा त्याग करणे हे सर्व प्रकारे अनुचित असल्याचे सिद्ध करणे. 


स्वधर्ममपि चावेक्ष्य न विकम्पितुमर्हसि 

धर्म्याद्धि युद्धाच्छ्रेयोऽन्यत्क्षत्रियस्य न विद्यते ॥३१॥


श्लोक अर्थ:-तसेच स्वतः चा धर्म लक्षात घेऊनही तू भिता कामा नये. कारण क्षत्रियाला धर्माला अनुसरून असलेल्या युद्धाहून दुसरे कोणतेही कल्याणकारक कर्तव्य नाही.(३१)


श्रीमद्भगवद्गीता अध्याय दुसरा श्लोक क्रं ३२


यदृच्छया चोपपन्नं स्वर्गद्वारमपावृतम् ।

सुखिनः क्षत्रियाः पार्थ लभन्ते युद्धमीदृशम् ||३२||


 श्लोक अर्थ:-हे पार्थ! आपोआप समोर आलेले, उघडलेले स्वर्गाचे दारच असे हे युद्ध भाग्यवान क्षत्रियांनाच लाभते.(३२)


श्रीमद्भगवद्गीता अध्याय दुसरा श्लोक क्रं ३३


अथ चेत्त्वमिमं धर्म्यं सङ्ग्रामं न करिष्यसि ।

ततः स्वधर्मं कीर्तिं च हित्वा पापमवाप्स्यसि ||३३||


श्लोक अर्थ:-परंतु जर तू हे धर्मयुक्त युद्ध केले नाहीस तर स्वधर्म आणि कीर्ती गमावून पापाला जवळ करशील.(३३)


श्रीमद्भगवद्गीता अध्याय दुसरा श्लोक क्रं ३४


अकीर्तिं चापि भूतानि कथयिष्यन्ति तेऽव्ययाम् ।

सम्भावितस्य चाकीर्तिर्मरणादतिरिच्यते ।। ३४ ।।


श्लोक अर्थ:-तसेच सर्व लोक तुझी चिरकाळ अपकीर्ती सांगत राहतील. आणि सन्माननीय पुरुषाला अपकीर्ती मरणाहून दु:सह वाटते.(३४)


श्रीमद्भगवद्गीता अध्याय दुसरा श्लोक क्रं ३५


भयाद्रणादुपरतं मंस्यन्ते त्वां महारथाः ।

येषां च त्वं बहुमतो भूत्वा यास्यसि लाघवम् ।।३५।।


श्लोक अर्थ:-शिवाय ज्यांच्या दृष्टीने तू आधी अतिशय आदरणीय होतास, त्यांच्या दृष्टीने आता तुच्छ ठरशील. ते महारथी तुला "भिऊन युद्धातून काढता पाय घेतला,' असे मानतील.(३५)


श्रीमद्भगवद्गीता अध्याय दुसरा श्लोक क्रं ३६


अवाच्यवादांश्च बहून्वदिष्यन्ति तवाहिताः ।

निन्दन्तस्तव सामर्थ्यं ततो दुःखतरं नु किम् ।। ३६ ।।


श्लोक अर्थ:-तुझे शत्रू तुझ्या सामर्थ्याची निन्दा करीत तुला पुष्कळसे नको नको ते बोलतील. याहून अधिक दुःखदायक काय असणार आहे ? (३६)


श्रीमद्भगवद्गीता अध्याय दुसरा श्लोक क्रं ३७


| या लोकी आणि परलोकी युद्ध लाभप्रद असल्याचे सांगून 

अर्जुनास त्यासाठी तयार होण्याची आज्ञा देणे.|


हतो वा प्राप्स्यसि स्वर्गं जित्वा वा भोक्ष्यसे महीम् ।

तस्मादुत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चयः ॥ ३७ ॥


श्लोक अर्थ:-युद्धात तू मारला गेलास तर स्वर्गाला जाशील अथवा युद्धात जिंकलास तर पृथ्वीचे राज्य भोगशील. म्हणून हे अर्जुना ! तू युद्धाचा निश्चय करून उभा रहा.(३७)


श्रीमद्भगवद्गीता अध्याय दुसरा श्लोक क्रं ३८


[ युद्धादी समस्त शास्त्रविहित कर्मांचे व्यवस्थितपणे आचरण करीत असतानाही पापापासून निर्लिप्त राहण्याचा उपाय म्हणजे समत्व. ]


सुखदुःखे समे कृत्वा लाभालाभौ जयाजयौ

ततो युद्धाय युज्यस्व नैवं पापमवाप्स्यसि ॥३८॥


श्लोक अर्थ:-जय-पराजय, फायदा-तोटा आणि सुख-दुःख समान मानून युद्धाला तयार हो. अशा रीतीने युद्ध केलेस तर तुला पाप लागणार नाही. (३८)


श्रीमद्भगवद्गीता अध्याय दुसरा श्लोक क्रं ३९


कर्मबंधने तोडण्यासाठी कर्मयोगविषयक बुद्धीचे वर्णन करण्याची प्रस्तावना.


एषा तेऽभिहिता साङ्ख्ये बुद्धिर्योगे त्विमां शृणु । 

बुद्ध्या युक्तो यया पार्थ कर्मबन्धं प्रहास्यसि ॥३९॥


श्लोक अर्थ:-हे पार्था ! हा विचार तुला ज्ञानयोगाच्या संदर्भात सांगितला. आणि आता कर्मयोगाविषयी ऐक. ज्या बुद्धीने युक्त झाला असता तू कर्माचे बंधन चांगल्या प्रकारे तोडून टाकशील.(३९)


श्रीमद्भगवद्गीता अध्याय दुसरा श्लोक क्रं ४०


कर्मयोगाच्या महिम्याचे वर्णन.


नेहाभिक्रमनाशोऽस्ति प्रत्यवायो न विद्यते । 

स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात् ॥ ४०॥


श्लोक अर्थ:-या कर्मयोगात आरंभाचा अर्थात् बीजाचा नाश नाही. आणि उलट फळरूप दोषही नाही. इतकेच नव्हे तर, या कर्मयोगरूप धर्माचे थोडेसेही साधन जन्ममृत्युरूप मोठ्या भयापासून रक्षण करते.(४०)


श्रीमद्भगवद्गीता अध्याय दुसरा श्लोक क्रं ४१


व्यवसायात्मिका बुद्धिरेकेह कुरुनन्दन 

बहुशाखा हानन्ताश बुद्धयोऽव्यवसायिनाम् ॥४१॥


श्लोक अर्थ:-हे अर्जुना ! या कर्मयोगात निश्चयात्मक बुद्धी एकच असते. परन्तु अस्थिर विचार असणाऱ्या, अविचारी, कामनायुक्त माणसांच्या बुद्धी खात्रीने पुष्कळ फाटे फुटलेल्या व असंख्य असतात.(४१)



श्रीमद्भगवद्गीता अध्याय दुसरा श्लोक क्रं ४२


(स्वर्ग -परायण सकाम मनुष्यांच्या स्वभावाचे वर्णन.)


यामिमां पुष्पितां वाचं प्रवदन्त्यविपश्चितः ।

वेदवादरताःपार्थ नान्यदस्तीति वादिनः || ४२||


श्लोक अर्थ:-हे अर्जुना ! जे भोगांत रमलेले असतात, कर्मफलाची स्तुती करणाऱ्या वेदवाक्यांची ज्यांना आवड आहे, ज्यांच्या मते स्वर्ग हीच श्रेष्ठ मिळवण्याजोगी वस्तू आहे, स्वर्गाहून श्रेष्ठ दुसरी कोणतीही गोष्ट नाही, असे जे सांगतात, ते अविवेकी लोक अशा प्रकारची जी पुष्पित म्हणजे दिखाऊ शोभायुक्त भाषा बोलत असतात, त्यांची ही भाषा जन्मरूप कर्मफल देणारी तसेच भोग व ऐश्वर्य मिळण्यासाठी अनेक प्रकारच्या क्रियांचे वर्णन करणारी असते. या भाषेने ज्यांचे अन्तःकरण आकृष्ट करून घेतले आहे, जे भोग व ऐश्वर्यात अत्यंत आसक्त आहेत, अशा पुरुषांची परमात्म्याविषयी निश्चयी बुद्धी असत नाही.(४२-४४)


श्रीमद्भगवद्गीता अध्याय दुसरा श्लोक क्रं ४३


कामात्मानः स्वर्गपरा जन्मकर्मफलप्रदाम् ।

क्रियाविशेषबहुलां भोगैश्वर्यगतिं प्रति ॥४३॥


श्लोक अर्थ:-हे अर्जुना ! जे भोगांत रमलेले असतात, कर्मफलाची स्तुती करणाऱ्या वेदवाक्यांची ज्यांना आवड आहे, ज्यांच्या मते स्वर्ग हीच श्रेष्ठ मिळवण्याजोगी वस्तू आहे, स्वर्गाहून श्रेष्ठ दुसरी कोणतीही गोष्ट नाही, असे जे सांगतात, ते अविवेकी लोक अशा प्रकारची जी पुष्पित म्हणजे दिखाऊ शोभायुक्त भाषा बोलत असतात, त्यांची ही भाषा जन्मरूप कर्मफल देणारी तसेच भोग व ऐश्वर्य मिळण्यासाठी अनेक प्रकारच्या क्रियांचे वर्णन करणारी असते. या भाषेने ज्यांचे अन्तःकरण आकृष्ट करून घेतले आहे, जे भोग व ऐश्वर्यात अत्यंत आसक्त आहेत, अशा पुरुषांची परमात्म्याविषयी निश्चयी बुद्धी असत नाही.(४२-४४)


श्रीमद्भगवद्गीता अध्याय दुसरा श्लोक क्रं ४४


भोगैश्वर्यप्रसक्तानां तयापहृतचेतसाम् ।

व्यवसायात्मिका बुद्धिः समाधौ न विधीयते ॥४४॥


श्लोक अर्थ:-हे अर्जुना ! जे भोगांत रमलेले असतात, कर्मफलाची स्तुती करणाऱ्या वेदवाक्यांची ज्यांना आवड आहे, ज्यांच्या मते स्वर्ग हीच श्रेष्ठ मिळवण्याजोगी वस्तू आहे, स्वर्गाहून श्रेष्ठ दुसरी कोणतीही गोष्ट नाही, असे जे सांगतात, ते अविवेकी लोक अशा प्रकारची जी पुष्पित म्हणजे दिखाऊ शोभायुक्त भाषा बोलत असतात, त्यांची ही भाषा जन्मरूप कर्मफल देणारी तसेच भोग व ऐश्वर्य मिळण्यासाठी अनेक प्रकारच्या क्रियांचे वर्णन करणारी असते. या भाषेने ज्यांचे अन्तःकरण आकृष्ट करून घेतले आहे, जे भोग व ऐश्वर्यात अत्यंत आसक्त आहेत, अशा पुरुषांची परमात्म्याविषयी निश्चयी बुद्धी असत नाही.(४२-४४)


श्रीमद्भगवद्गीता अध्याय दुसरा श्लोक क्रं ४५


| अर्जुनास निष्काम व आत्मसंयमी होण्याची आज्ञा. ]


त्रैगुण्यविषया वेदा निस्त्रैगुण्यो भवार्जुन 

 निर्द्वन्द्वो नित्यसत्त्वस्थो निर्योगक्षेम आत्मवान् ॥४५॥


श्लोक अर्थ:-हे अर्जुना ! वेद वर सांगितल्याप्रमाणे तिन्ही गुणांची कार्ये असणारे सर्व भोग आणि त्यांची साधने सांगणारे आहेत. म्हणून तू ते भोग आणि त्यांच्या साधनांच्या बाबतीत आसक्ती बाळगू नकोस. तसेच सुख-दुःखादी द्वंद्वांनी रहित, नित्यवस्तू असणाऱ्या परमात्म्यात स्थित, योगक्षेमाची इच्छा न बाळगणारा आणि अन्तःकरणाला ताब्यात ठेवणारा हो...(४५)


श्रीमद्भगवद्गीता अध्याय दुसरा श्लोक क्रं ४६



ब्रह्मज्ञ ब्राह्मणाला वेदोक्त कर्मफलरूप सुखभोग हे अप्रयोजनीय असल्याचे कथन. 


यावानर्थ उदपाने सर्वतः सम्प्लुतोदके ।

तावान्सर्वेषु वेदेषु ब्राह्मणस्य विजानतः ॥ ४६॥


श्लोक अर्थ:-सर्व बाजूंनी भरलेला मोठा जलाशय मिळाल्यावर लहान जलाशयाची मनुष्याला जेवढी गरज असते, तेवढीच चांगल्या प्रकारे ब्रह्म जाणणाऱ्या ब्राह्मणाला वेदांची गरज उरते.(४६)


श्रीमद्भगवद्गीता अध्याय दुसरा श्लोक क्रं ४७


सूत्ररूपाने कर्मयोगाच्या स्वरूपाचे वर्णन. 


कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन 

मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते सङ्गोऽस्त्वकर्मणि ॥४७॥


श्लोक अर्थ:-तुला कर्म करण्याचाच अधिकार आहे. त्याच्या फळाविषयी कधीही नाही. म्हणून तू कर्मांच्या फळांची इच्छा करणारा होऊ नकोस. तसेच कर्म न करण्याचाही आग्रह धरू नकोस.(४७)


श्रीमद्भगवद्गीता अध्याय दुसरा श्लोक क्रं ४८


[ योगाच्या व्याख्येच्या रूपात समत्वाचे कथन. ]


योगस्थः कुरु कर्माणि सङ्गं त्यक्त्वा धनञ्जय 

सिद्ध्यसिद्ध्योः समो भूत्वा समत्वं योग उच्यते ॥४८॥


श्लोक अर्थ:-हे धनंजया ! तू आसक्ती सोडून तसेच सिद्धी आणि असिद्धीमध्ये समान भाव ठेवून योगात स्थिर होऊन कर्तव्य कर्मे कर. समत्वालाच योग म्हटले आहे.(४८)


श्रीमद्भगवद्गीता अध्याय दुसरा श्लोक क्रं ४९


| समत्व बुद्धीपेक्षा सकाम कर्मे ही अत्यंत तुच्छ होत आणि त्यांचे फल इच्छिणारे अत्यंत दीन होत, असे सांगणे. |


दूरेण ह्यवरं कर्म बुद्धियोगाद्धनञ्जय ।

बुद्धौ शरणमन्विच्छ कृपणाः फलहेतवः ॥४९॥


श्लोक अर्थ:-या समत्वरूप बुद्धियोगापेक्षा सकाम कर्म अत्यन्त तुच्छ आहे. म्हणून हे धनंजया ! तू समबुद्धीतच रक्षणाचा उपाय शोध म्हणजे बुद्धियोगाचाच आश्रय घे. कारण फळाची इच्छा बाळगणारे अत्यन्त दीन होत. (४९)


श्रीमद्भगवद्गीता अध्याय दुसरा श्लोक क्रं ५०


समत्व बुद्धियुक्त पुरुषाची प्रशंसा करून अर्जुनास कर्मयोगाच्या अनुष्ठानाची आज्ञा देणे व समभावाचे फल हे अनामय पदाची प्राप्ती असल्याचे सांगणे. ] 


बुद्धियुक्तो जहातीह उभे सुकृतदुष्कृते 

तस्माद्योगाय युज्यस्व योगः कर्मसु कौशलम् ॥५०॥


श्लोक अर्थ:-समबुद्धीचा पुरुष पुण्य व पाप या दोहोंचाही याच जगात त्याग करतो. अर्थात् त्यांपासून मुक्त असतो. म्हणून तू समत्वरूप योगाला चिकटून राहा हा समत्वरूप योगच कर्मांतील दक्षता आहे, म्हणजेच कर्मबन्धनातून सुटण्याचा उपाय आहे..(५०)




अध्याय दुसरा


श्रीमद्भगवद्गीता अध्याय दुसरा श्लोक क्रं ५१


कर्मजं बुद्धियुक्ता हि फलं त्यक्त्वा मनीषिणः 

जन्मबन्धविनिर्मुक्ताः पदं गच्छन्त्यनामयम् ॥। ५१ ।।


श्लोक अर्थ:-कारण समबुद्धीने युक्त असलेले ज्ञानी लोक कर्मापासून उत्पन्न होणाऱ्या फळाचा त्याग करून जन्मरूप बंधनापासून मुक्त होऊन निर्विकार परमपदाला प्राप्त होतात.(५१)


श्रीमद्भगवद्गीता अध्याय दुसरा श्लोक क्रं ५२


यदा ते मोहकलिलं बुद्धिर्व्यतितरिष्यति

 तदा गन्तासि निर्वेदं श्रोतव्यस्य श्रुतस्य च ॥५२॥


श्लोक अर्थ:-जेव्हा तुझी बुद्धी मोहरूपी चिखलाला पूर्णपणे पार करून जाईल, तेव्हा ऐकलेल्या व ऐकण्यासारख्या इह-परलोकातील सर्व भोगांपासून विरक्त होशील.(५२)


श्रीमद्भगवद्गीता अध्याय दुसरा श्लोक क्रं ५३


श्रुतिविप्रतिपन्ना ते यदा स्थास्यति निश्चला 

 समाधावचला बुद्धिस्तदा योगमवाप्स्यसि ॥५३॥


श्लोक अर्थ:-तऱ्हेतऱ्हेची वचने ऐकून विचलित झालेली तुझी बुद्धी जेव्हा परमात्म्यात अचलपणे स्थिर राहील, तेव्हा तू योगाला प्राप्त होशील म्हणजेच तुझा परमात्म्याशी नित्यसंयोग होईल.(५३)


श्रीमद्भगवद्गीता अध्याय दुसरा श्लोक क्रं ५४


[ स्थिरबुद्धी पुरुषाविषयी अर्जुनाचे चार प्रश्न.]

अर्जुन उवाच


स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्थस्य केशव ।

स्थितधीः किं प्रभाषेत किमासीत व्रजेत किम् ॥ ५४॥


श्लोक अर्थ:-अर्जुनाने विचारले, हे केशवा ! जो समाधीत परमात्म्याला प्राप्त झालेला आहे, अशा स्थिरबुद्धी पुरुषाचे लक्षण काय ? तो स्थिरबुद्धी पुरुष कसा बोलतो, कसा बसतो, आणि कसा चालतो?(५४)


श्रीमद्भगवद्गीता अध्याय दुसरा श्लोक क्रं ५५


【 पहिल्या प्रश्नाचे उत्तर देत स्थिरबुद्धी पुरुष हा समस्त कामनांनी रहित आणि आत्म्यामध्येच संतुष्ट असतो, असे सांगणे.】

          

             श्रीभगवानुवाच


प्रजहाति यदा कामान्सर्वान्पार्थ मनोगतान् । 

आत्मन्येवात्मना तुष्टः स्थितप्रज्ञस्तदोच्यते ॥५५॥


श्लोक अर्थ:-श्रीभगवान म्हणाले - हे अर्जुना ! ज्या वेळी हा पुरुष मनातील सर्व कामना पूर्णपणे टाकतो आणि आत्म्यानेच आत्म्याच्या ठिकाणी संतुष्ट राहतो, त्यावेळी त्याला स्थितप्रज्ञ म्हटले जाते.(५५)


श्रीमद्भगवद्गीता अध्याय दुसरा श्लोक क्रं ५६


  स्थिरबुद्धी असलेला पुरुष हा दुःखामध्ये अनुद्विन सुखांमध्ये निःस्पृह आणि शुभाशुभाच्या प्राप्तीमध्ये हर्ष - शोकादी द्वंद्वांपासून रहित असतो, असे सांगून दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर देणे. ]


दुःखेष्वनुद्विग्नमनाःसुखेषु विगतस्पृहः 

वीतरागभयक्रोधः स्थितधीर्मुनिरुच्यते ॥५६॥


श्लोक अर्थ:-दुःखदायक प्रसंगी ज्याच्या मनाला खेद वाटत नाही, सुखांच्या प्राप्तीविषयी ज्याला मुळीच इच्छा नाही, तसेच ज्याचे प्रीती, भय व क्रोध नाहीसे झाले आहेत, असा मुनी स्थिरबुद्धी म्हटला जातो.(५६)


श्रीमद्भगवद्गीता अध्याय दुसरा श्लोक क्रं ५७


यः सर्वत्रानभिस्नेहस्तत्तत्प्राप्य शुभाशुभम् । 

नाभिनन्दति न द्वेष्टि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता ॥५७॥


श्लोक अर्थ:- जो पुरुष सर्व बाबतीत स्नेहशून्य असून त्या त्या शुभ किंवा अशुभ गोष्टी घडल्या असता प्रसन्नही होत नाही किंवा त्यांचा द्वेषही करीत नाही, त्याची बुद्धी स्थिर झाली.(५७)


श्रीमद्भगवद्गीता अध्याय दुसरा श्लोक क्रं ५८


[ तिसऱ्या प्रश्नाच्या उत्तरात कासवाचे उदाहरण देत इंद्रिय निग्रहाविषयी सांगणे. ] 


यदा संहरते चायं कूर्मोऽङ्गानीव सर्वशः  इन्द्रियाणीन्द्रियार्थेभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता ॥५८॥


श्लोक अर्थ:-कासव सर्व बाजूंनी आपले अवयव जसे आत ओढून धरते, त्याचप्रमाणे जेव्हा हा पुरुष इन्द्रियांच्या विषयांपासून इंद्रियांना सर्व प्रकारे आवरून घेतो, तेव्हा त्याची बुद्धी स्थिर झाली, असे समजावे.(५८)


श्रीमद्भगवद्गीता अध्याय दुसरा श्लोक क्रं ५९


| इंद्रियांकडून हट्टाने विषयांचे ग्रहण न केल्यास विषयांची निवृत्ती झाली तरी आसक्तीची निवृत्ती होत नाही. ती निवृत्ती परमात्मदर्शनामुळे होते, असे सांगणे. ]


विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिनः ।

रसवर्जं रसोऽप्यस्य परं दृष्ट्वा निवर्तते।। ५९ ।।


श्लोक अर्थ:-इंद्रियांनी विषयांचे सेवन न करणाऱ्या पुरुषाचेही केवळ विषयच दूर होतात; परंतु त्यांच्याविषयीची आवड नाहीशी होत नाही. या स्थितप्रज्ञ पुरुषाची तर आसक्तीही परमात्म्याच्या साक्षात्काराने नाहीशी होते. (५९)


श्रीमद्भगवद्गीता अध्याय दुसरा श्लोक क्रं ६०


| इंद्रियांच्या प्रबलतेचे निरूपण |


यततो ह्यपि कौन्तेय पुरुषस्य विपश्चितः 

इन्द्रियाणि प्रमाथीनि हरन्ति प्रसभं मनः ॥ ६०॥


श्लोक अर्थ:-हे अर्जुना ! आसक्ती नाहीशी न झाल्यामुळे ही क्षोभ उत्पन्न करणारी इन्द्रिये प्रयत्न करीत असलेल्या बुद्धिमान पुरुषाच्या मनालाही जबरदस्तीने आपल्याकडे ओढून घेतात.(६०)


श्रीमद्भगवद्गीता अध्याय दुसरा श्लोक क्रं ६१


| मन आणि इंद्रिये यांना संयमाने भगवत्परायण करण्याची प्रेरणा व इंद्रियविजयी पुरुष यांची प्रशंसा. ]


तानि सर्वाणि संयम्य युक्त आसीत मत्परः ।

वशे हि यस्येन्द्रियाणि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता ॥ ६१ ॥


श्लोक अर्थ:-म्हणून साधकाने त्या सर्व इन्द्रियांना ताब्यात ठेवून, चित्त स्थिर करून, मनाला माझाच आधार देऊन ध्यानास बसावे. कारण इन्द्रिये ज्या पुरुषाच्या ताब्यात असतात, त्याची बुद्धी स्थिर होते.(६१)



श्रीमद्भगवद्गीता अध्याय दुसरा श्लोक क्रं ६२


विषयाच्या चिंतनामुळे आसक्ती इत्यादी अवगुणांची उत्पत्ती आणि अध:पतन होते, याचे कथन. 


ध्यायतो विषयान्पुंसः सङ्गस्तेषूपजायते 

सङ्गात्सञ्जायते कामः कामात्क्रोधोऽभिजायते ॥ ६२॥


श्लोक अर्थ:-विषयांचे चिन्तन करणाऱ्या पुरुषाची त्या विषयांत आसक्ती उत्पन्न होते. आसक्तीमुळे त्या विषयांची कामना उत्पन्न होते. कामना पूर्ण झाल्या नाहीत की राग येतो.(६२)


श्रीमद्भगवद्गीता अध्याय दुसरा श्लोक क्रं ६३


क्रोधाद्भवति सम्मोहःसम्मोहात्स्मृतिविभ्रमः

स्मृतिभ्रंशाद् बुद्धिनाशो बुद्धिनाशात्प्रणश्यति ॥६३॥


श्लोक अर्थ:-रागामुळे अत्यंत मूढता अर्थात् अविचार उत्पन्न होतो. मूढतेमुळे स्मरणशक्ती भ्रष्ट होते. स्मरणशक्ती भ्रष्ट झाली की बुद्धीचा म्हणजे ज्ञानशक्तीचा नाश होतो. आणि बुद्धीचा नाश झाल्यामुळे माणसाचा अधःपात होतो.(६३)


श्रीमद्भगवद्गीता अध्याय दुसरा श्लोक क्रं ६४


प्रीतिद्वेष यांनी रहित झाल्याने कर्म करणाऱ्यांना प्रसादाची प्राप्ती होते, त्यामुळे सर्व दुःखांचा नाश आणि त्याची बुद्धी शीघ्र स्थिर होते, याचे कथन करीत चौथ्या प्रश्नाचे उत्तर. । 


रागद्वेषवियुक्तैस्तु विषयानिन्द्रियैश्चरन् ।

आत्मवश्यैर्विधेयात्मा प्रसादमधिगच्छति ॥ ६४॥


श्लोक अर्थ:-परन्तु अन्तःकरण ताब्यात ठेवलेला साधक आपल्या ताब्यात ठेवलेल्या प्रीति-द्वेष-रहित इन्द्रियांनी विषयांचा उपभोग घेत असूनही अन्तःकरणाची प्रसन्नता प्राप्त करून घेतो.(६४)


श्रीमद्भगवद्गीता अध्याय दुसरा श्लोक क्रं ६५


प्रसादे सर्वदुःखानां हानिरस्योपजायते । प्रसन्नचेतसो ह्याशु बुद्धिः पर्यवतिष्ठते ॥ ६५॥


श्लोक अर्थ:-अन्तःकरण प्रसन्न असल्यामुळे त्याची सर्व दुःखे नाहीशी होतात. आणि त्या चित्त प्रसन्न असलेल्या कर्मयोग्याची बुद्धी तत्काळ सर्व गोष्टींपासून निवृत्त होऊन एका परमात्म्यामध्येच उत्तम प्रकारे स्थिर होते. (६५)


श्रीमद्भगवद्गीता अध्याय दुसरा श्लोक क्रं ६६


[ अयुक्त पुरुषामध्ये श्रेष्ठ बुद्धी, भगवच्चिंतन, शांती आणि

सुख यांचा अभाव होतो, त्याचे कथन ]


नास्ति बुद्धिरयुक्तस्य न चायुक्तस्य भावना। 

न चाभावयतः शान्तिरशान्तस्य कुतः सुखम् ॥६६॥


श्लोक अर्थ:-मन आणि इन्द्रिये न जिंकणाऱ्या पुरुषाच्या ठिकाणी निश्चयात्मक बुद्धी नसते आणि अशा अयुक्त पुरुषाच्या अन्तःकरणात आस्तिक भावही नसतो. तसेच भावशून्य माणसाला शान्ती मिळत नाही. मग शान्ती नसलेल्या माणसाला सुख कोठुन मिळणार?.(६६)


श्रीमद्भगवद्गीता अध्याय दुसरा श्लोक क्रं ६७


वायू व नौका यांच्या दृष्टांताने मनाच्या संयोगामुळे इंद्रिय हे बुद्धीचे हरण करते, असे सांगणे.]


 इन्द्रियाणां हि चरतां यन्मनोऽनु विधीयते ।

तदस्य हरति प्रज्ञां वायुर्नावमिवाम्भसि ॥६७॥


श्लोक अर्थ:-कारण ज्याप्रमाणे पाण्यात चालणाऱ्या नावेला वारा वाहून नेतो, त्याचप्रमाणे विषयांत वावरणाऱ्या इंद्रियांपैकी मन ज्या इन्द्रियाबरोबर राहते, ते एकच इन्द्रिय या अयुक्त पुरुषाची बुद्धी हिरावून घेते.(६७)


श्रीमद्भगवद्गीता अध्याय दुसरा श्लोक क्रं ६८


स्थिरबुद्धी पुरुषांच्या लक्षणांमध्ये इंद्रियनिग्रहाचे प्राधान्य. 


तस्माद्यस्य महाबाहो निगृहीतानि सर्वशः 

इन्द्रियाणीन्द्रियार्थेभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता ॥ ६८॥


श्लोक अर्थ:-म्हणून हे महाबाहो ! ज्याची इन्द्रिये इन्द्रियांच्या विषयांपासून सर्व प्रकारे आवरून धरलेली असतात, त्याची बुद्धी स्थिर असते.(६८)


श्रीमद्भगवद्गीता अध्याय दुसरा श्लोक क्रं ६९


सामान्य मनुष्यांना ब्रह्मानंद तसेच तत्त्ववेत्त्या पुरुषाला विषयसुख

हे रात्रीप्रमाणे असते, असे सांगणे.


या निशा सर्वभूतानां तस्यां जागर्ति संयमी । 

यस्यां जाग्रति भूतानि सा निशा पश्यतो मुनेः ॥६९॥


श्लोक अर्थ:-सर्व प्राण्यांच्या दृष्टीने जी रात्रीसारखी असते, अशा नित्य ज्ञानस्वरूप परमानन्दाच्या प्राप्तीत स्थितप्रज्ञ योगी जागतो आणि ज्या नाशिवंत सांसारिक सुखाच्या प्राप्तीत सर्व प्राणी जागतात, ती परमात्मतत्त्व जाणणाऱ्या मुनीला रात्रीसारखी असते.(६९)


श्रीमद्भगवद्गीता अध्याय दुसरा श्लोक क्रं ७०


【समुद्राच्या दृष्टांताने ज्ञानी महापुरुषांचा महिमा सांगणे.】


 आपूर्यमाणमचलप्रतिष्ठं समुद्रमापः प्रविशन्ति यद्वत् ।

तद्वत्कामा यं प्रविशन्ति सर्वे स शान्तिमाप्नोति न कामकामी ॥७०॥


श्लोक अर्थ:-ज्याप्रमाणे निरनिराळ्या नद्यांचे पाणी, सर्व बाजूंनी भरलेल्या व स्थिर असलेल्या समुद्रात त्याला विचलित न करताही सामावून जाते, त्याचप्रमाणे सर्व भोग ज्या स्थितप्रज्ञ पुरुषामध्ये कोणत्याही प्रकारचा विकार उत्पन्न न करताच सामावून जातात, तोच पुरुष परम शान्तीला प्राप्त होतो. भोगांची इच्छा करणारा नव्हे.॥७०॥


श्रीमद्भगवद्गीता अध्याय दुसरा श्लोक क्रं ७१


(कामना, स्पृहा, ममता व अहंकार इत्यादींनी रहित होऊन वावरणाऱ्या पुरुषाला परमशांतीची प्राप्ती.)


विहाय कामान्यः सर्वान्पुमांश्चरति निःस्पृहः

निर्ममो निरहङ्कारः स शान्तिमधिगच्छति ॥७१॥


श्लोक अर्थ:-जो पुरुष सर्व कामनांचा त्याग करून, ममता, अहकार आणि इच्छा टाकून राहात असतो, त्यालाच शान्ती मिळते.(७१)


श्रीमद्भगवद्गीता अध्याय दुसरा श्लोक क्रं ७२


ब्राह्मी स्थितीच्या माहात्म्याचे वर्णन करीत अध्यायाचा उपसंहार.


 एषा ब्राह्मी स्थितिः पार्थ नैनां प्राप्य विमुह्यति । 

स्थित्वास्यामन्तकालेऽपि ब्रह्मनिर्वाणमृच्छति ॥७२॥


श्लोक अर्थ:-हे अर्जुना ! ब्रह्माला प्राप्त झालेल्या पुरुषाची ही स्थिती ही प्राप्त झाल्याने योगी कधी मोहित होत नाही. आणि अन्तकाळीही या ब्राह्मी स्थितीत स्थिर होऊन ब्रह्मानन्द मिळवतो. (७२)